Manoj Jarange Patil Vashi Sabha: यांच्या वाशीतील सभेतील मुद्दे

Manoj Jarange Patil Vashi Sabha: नोंदी सापडलेल्या ५४ लाख बांधवांना व त्यांच्या परिवाराला कुणबी प्रमाणपत्र वाटप करा
सरकार: कुणबी नोदींची संख्या वाढून ५७ लाख झाली आहे. आत्तापार्यंत ३७ लाख मराठा बांधवांना कुणबी प्रमाणपत्र दिली आहेत. प्रमाणपत्र वाटपाचे काम सुरु आहे.

पाटील: नोदी सापडलेल्या गावात सापडलेल्या नोंदींची यादी ग्रामपंचायतला लावा व जनजागृतीसाठी शिबिरे सुरु करा
सरकार: यादी लावण्याचे काम व जनजागृती शिबिरे सुरु आहेत.

पाटील: ज्यांना कुणबी प्रमाणपत्र वाटप केले त्यांचा डेटा द्या
सरकार: (सुधारित मागणी असल्यामुळे अजून उत्तर नाही)

पाटील: शिंदे समितीला एक वर्षाची मुदतवाढ देऊन, नोंदी शोधण्याचे काम सुरूच ठेवावे
सरकार: शिंदे समितीचे मुदत २ महिन्यांनी वाढवली. गरजेनुसार टप्प्या टप्याने मुदत वाढवली जाईल.

पाटील: ज्यांची नोंद मिळाली त्यांच्या सग्या-सोयऱ्यांनाही प्रमाणपत्र द्या.
सरकार: सग्या-सोयऱ्यांचा अध्यादेश काढला जाईल. परंतु सरकारकडे सग्या-सोयऱ्यांची नोंद नाही. ज्यांना प्रमाणपत्र पाहिजे त्यांनी शपथपत्र द्यावे कि हा (प्रमाणपत्र धारक) माझा सोयरा आहे. तसेच वंशावळी जुळवण्यासाठी तालुका स्थरावर समिती गठीत केली आहे.

पाटील: आज (दि २६ जानेवारी रोजी) रात्रीपर्यंत सग्या-सोयऱ्यांचा अद्यादेश द्यावा.
सरकार: सग्या-सोयऱ्यांच्या अध्यादेशावर सर्व सचिव, उपमुख्यमंत्री व मुख्यमंत्री यांनी सही केली. (अद्यादेश अजून काढलेला नाही)

पाटील: शपथपत्र रु.१०० च्या बॉन्डवर घेऊ नये, मराठ्यांचे करोडो रुपये खर्च होतील, ते मोफत करा
सरकार: मागणी मान्य

पाटील: अंतरवालीसह महाराष्ट्रातील सर्व गुन्हे मागे घावे
सरकार: गृह विभागाकडून याबाबत विहित प्रक्रिया अवलंबून गुन्हे मागे घेण्याचे निर्देश दिले आहेत.

पाटील: गुन्हे मागे घेण्याचे निर्देश दिले आहेत, ते पात्र आम्हाला द्या
सरकार: सुधारित मागणी असल्यामुळे अजून उत्तर नाही.

पाटील: गायकवाड आयोगानुसार मिळालेले आरक्षण सुप्रीम कोटने रद्द केले. त्यावर क्युरेटिव्ह पिटिशनची प्रक्रिया सुरु आहे. ते आरक्षण मिळेपर्यंत सग्या- सोयऱ्यांतून जर एखादा मराठा बांधव आरक्षणापासून दूर राहिला तर त्यांना १००% मोफत शिक्षण करण्यात यावे.
सरकार: राज्यातील मुलींना केजी टू पीजी शिक्षण मोफत देण्याचा शासन निर्णय निर्गमित केला आहे.

पाटील: मुलांबद्दल उत्तर नाही, तो घ्यावा
सरकार: सुधारित मागणी असल्यामुळे अजून उत्तर नाही

पाटील: आरक्षण मिळेपर्यंत नोकरभरती करू नये, जर केली तर आमच्या जागा राखीव ठेऊन करावी.
सरकार: अजून निर्णय नाही

पाटील: कोपर्डीच्या ताईला लवकर न्याय मिळावा यासाठी लवकर कारवाई करावी
सरकार: कोपर्डीच्या खटल्याबाबतचे आदेश दिले आहेत

पाटील: SEBC आरक्षणानुसार निवड झालेल्या उमेदवारांना नियुत्या द्याव्यात.
सरकार: एकूण ४७७२ उमेदवारांना नियुक्त्या देण्यात येत आहेत.

पाटील: सग्या सोयऱ्यांचा अध्यादेश दिला तरी आझाद मैदानावर जाणार

आरक्षण दिले तर गुलाल उधळायला,
नाही दिलं तर आमरण उपोषण करायला..

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Comment