मागासवर्ग आयोगाचा सर्वे तुमच्या भागात सुरु झाला का ? काय असतील सर्वे ची प्रश्न? Manoj Jarange Patil | Maratha Reservation Survey

Manoj Jarange Patil | Maratha Reservation Survey
  • Manoj Jarange Patil | Maratha Reservation Survey:
  • तुमच्या समाजात विधवा स्त्रियांना कपाळाला कुंकू लावण्याची परवानगी आहे का?
  • लग्न झालेल्या स्त्रियांनी डोक्यावर पदर घेतलाच पाहिजे असा कुठला नियम आहे का? 
  • जागरण गोंधळ किंवा इतर कुठल्या विधींसाठी कोंबडा किंवा बोकड कापण्याची पद्धत आहे का? 
  • हे आणि असे एकूण 154 प्रश्न विचारून आता महाराष्ट्रात एक सर्वे केला जाणार आहे. 

राज्य मागासवर्ग आयोगाने मराठा समाजाचे मागासले पण सिद्ध करण्यासाठी, मराठा समाज आणि खुल्या प्रवर्गाचं सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. 

आता या सर्वेक्षणात नेमके कोणते प्रश्न विचारले जातील? Manoj Jarange Patil | Maratha Reservation Survey 

या कामाच्या मोबदल्यात कर्मचाऱ्यांना किती पैसे मिळतील, आणि या सर्वेक्षणामुळे मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय घेता येऊ शकतो का? 

या सगळ्याबद्दल खालील लेखात जाणून घेऊ:

सरकार कडून समाजाला आरक्षण देण्याचे प्रयत्न झाले म्हणून वारंवार हे आरक्षण न्यायालयात कायद्याच्या कसोटीवर टिकू शकले नाही. त्यामुळे पुन्हा एकदा (Empirical Data) गोळा करणे आवश्यक असल्याचा समोर आलं. 

यानंतर मागासवर्ग आयोगाने या सर्वेक्षणासाठी एक प्रश्नावली निश्चित केली आहे त्यानुसार एकूण पाच प्रकारचे प्रश्न विचारले जातील, आणि हे सर्व Module मध्ये विभागणी केली जाणार आहे

Module A मूलभूत माहिती:-

नाव
पत्ता
गाव / शहर
तालुका 
जिह्वा
गाव दुर्गम भागात आहे का ?
आधार कार्ड नंबर ?
मोबाईल क्रमांक 
वर्गवारी जात ?
प्रवर्ग ?
तुम्ही मराठा आहेत का ?
नसल्यास जात कोणती ?
Maratha Reservation Survey Form

यातल्या Module A मध्ये तुमच्या कुटुंबाची मूलभूत माहिती तुमचं नाव, पत्ता, तुम्ही मराठा आहात का?  नसला तर तुमची जात कोणती असे एकूण 14 प्रश्न विचारले जातील.

Model B कुटुंबाचे प्रश्न 

  • तुम्ही कोणता घरात राहता? 
  • तुमचं कुटुंब संयुक्त आहे की विभक्त? 
  • तुमच्या जातीचा पारंपारिक व्यवसाय कोणता? 
  • सध्या तुम्ही काय करता? 
  • कुटुंबात लोकप्रतिनिधी आहेत का?  असे एकूण वीस प्रश्न असतील. 

Model C आर्थिक स्थिती

  • तुमच्या घरात शौचालय आहे का? 
  • शेती आहे का असेल तर ती कोणाच्या नावे आहे ?
  • कुटुंबावर किती कर्ज आहे? 
  • मागच्या पंधरा वर्षात तुम्ही स्थावर मालमत्ता विकलीये का ?
  • तुमच्या कुटुंबातील एखादी महिला इतरांच्या घरी दोन्ही भांडी स्वयंपाक अशी काम करते का ?
  • असे एकूण 76 प्रश्न याच्यात असतील.

Model D सामाजिक मागासलेपण

  • तुमच्या समाजात हुंडा देण्याची पद्धत आहे का? 
  • विधवा स्त्रियांना मंगळसूत्र घालण्याची परवानगी आहे का? 
  • तुमच्या कुटुंबात मुलांच्या लग्नाचा निर्णय कोण घेत? 
  • गेल्या दहा वर्षात तुमच्या कुटुंबातल्या कुणी आत्महत्या केले का? 

असे एकूण 33 प्रश्न असतील 

Module E कुटुंबाचे आरोग्य

या  Module E  मध्ये कुटुंबाच्या आरोग्याबाबत अकरा प्रश्न विचारले जातील, असे एकूण 154 प्रश्न विचारून तुमचं कुटुंब सामाजिक आर्थिक दृष्ट्या मागास आहे की नाही हे ठरवलं जाईल. महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाने राज्यातल्या मराठा समाजाचे मागासले पण तपासण्याचं काम हातात घेतलं. 

त्यासाठी राज्यातल्या सगळ्या ग्रामीण आणि शहरी भागातल्या मराठा आणि खुल्या प्रवर्गातल्या नागरिकांचं सर्वेक्षण होतंय. पुणे महापालिका आयुक्तांनी काढलेल्या आदेशानुसार हे सर्वेक्षण 23 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या आठ दिवसांच्या काळात पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या गेल्यात. 

राज्यातल्या मराठा समाज आणि खुल्या प्रवर्गाची संख्या पाहता हे सर्वेक्षण इतक्या कमी कालावधीत पूर्ण करणं हे शासकीय यंत्रणे समोरच एक मोठा आव्हान असणार आहे. या कामात पुण्याच्या (Gokhale Institute) ची सुद्धा शासनाने मदत घेतली. 

हे सर्वेक्षण करण्यासाठी पर्यवेक्षक आणि प्रगणकांची नेमणूक केले जातील. या कामासाठी अधिकाऱ्यांना अतिरिक्त मानधन देण्याची गरज आहे. यासाठी जिल्हाधिकारी महानगरपालिका आयुक्त उपजिल्हाधिकारी तहसीलदार आणि या कामासाठी नियुक्त करण्यात येणार आहेत. 

वर्ग दोन किंवा त्यापेक्षा वरिष्ठ अधिकाऱ्यांना त्यांच्या मूळ वेतनाच्या पन्नास टक्के रक्कम ही मानधन म्हणून दिली जाईल. हे सर्वेक्षण करण्यासाठी पर्यवेक्षक आणि प्रग्नकांना प्रत्येकी दहा हजार रुपये दिले जातील. 

राज्य मागासवर्ग आयोगाने 31 जानेवारीपर्यंत हे सर्वेक्षण पूर्ण करण्याचे आदेश दिलेत त्यावरून हे स्पष्ट होतं की मनोज जरांगे यांनी दिलेल्या 26 जानेवारी पर्यंतच्या मुदतीत हे सर्वेक्षण पूर्ण होणार नाही. 

जरांगेंनी मुंबईला येऊ नये यासाठी सरकार अजूनही प्रयत्न करत आहेत.

Maratha Aarakshan Mumbai March साठीच्या मोर्चाचा तिसरा दिवस,गर्दी किती, काय घडतयं- Manoj Jarange Patil

Maratha Aarakshan Mumbai March. Manoj Jarange Patil

Maratha Aarakshan Mumbai March: आरक्षण मिळाल्याशिवाय मागे हटणार नाही मी असेल नसेल माहित नाही अशा शब्दात आपल्या भावना व्यक्त करत  मनोज जरांगे पाटील उपोषण करण्यासाठी मराठा समाजाला सोबत घेऊन मुंबई मोर्चा वर निघालेत.

20 जानेवारीला या मोर्चाची सुरुवात आंतरवाली सराटीपासून झाली. 

आज मोर्चाचा तिसरा दिवस:  

(3 Crore )तीन करोड मराठा समाज मुंबईच्या आजाद मैदानावर उपोषणाला बसणार असल्याचा इशारा मनोज जरांगे पाटलांनी काही दिवसांपूर्वी दिला होता हा मोर्चा 26 जानेवारीला मुंबईच्या आजाद मैदानावर पोचणार आहे. 

मुंबईत पोहोचल्यावर आरक्षणासाठी जरांगे आमरण उपोषण करणार आहेत,  आता हळूहळू या मोर्चात मराठा बांधव मोठ्या प्रमाणात सामील होत असून मोर्चाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच रविवारी सकाळी दहा वाजता माथुरी गावातून निघालेले मनोज जरांगे पाटील रात्री उशिरा बारा बाभळी येथे पोहोचले. 

मुंबईच्या दिशेने मोर्चेकरांनी निघू नये यासाठी शेवटपर्यंत सरकारचे शिस्टमंडळ प्रयत्न करत होते अगदी बच्चू कडू मुख्यमंत्र्यांचे ODS मंगेश चिमटे यांचे प्रयत्न चालू होते पण सरकार वेळ काढूपणा करतय.

54 लाख कुणबी नोंदी सापडल्या 

अशी बातमी Maratha Reservation March आंदोलना अगोदर आली. जेवढ्या कुणबी नोंदी सापडल्या त्यांना तात्काळ कुणबी प्रमाणपत्र देण्याचे आदेश महसूल विभागाचे मुख्य सचिवांकडून देण्यात आले.  

प्रमाणपत्र देण्यासाठी विशेष शिबिर आयोजित करण्याचे देखील आदेश देण्यात आलेत,  कुणबी प्रमाणपत्र देण्याची सुरुवात देखील झाली आहे मात्र हे दाखले वीस तारखेपर्यंत देण्याचा अल्टिमेटम जरांगेचा होता तो आता संपलाय.

मोर्चाच्या पहिल्या दिवशी नेमका काय घडलं

आता  20 जानेवारीला सकाळी साडेदहा वाजता आंतरवाली सराटीतून मनोज जरांगे पाटील हजारोंच्या संख्येने मुंबईकडे निघाले त्या अनुषंगाने पोलीस प्रशासन देखील सज्ज करण्यात आलं होतं. 

पोलिसांचा सगळा बंदोबस्त वडीगोद्री फाटा येथे लावण्यात आला होता मात्र मुंबईला निघण्यापूर्वी जरांगे पाटलांनी आंतरवाली सराटी मध्ये पत्रकार परिषद आयोजित केली होती दरम्यान यावेळी बोलताना मनोज जरांगे पाटील भावुक झाल्याचे पाहायला मिळालं आपल्या भावना व्यक्त करताना जरांगे भर पत्रकार परिषदेत रडल्याचे देखील पाहायला मिळालं.

मी तुमच्यात असेल नसेल माहित नाही अशा शब्दात त्यांनी हा लढा सुरूच ठेवण्याचे निर्देश दिलेत.

त्यावेळी होमगार्ड राज्य राखीव पोलीस दलाचे जवान शीघ्रकृती दलाचे जवानाचे सुमारे दीड हजार पोलिसांचा तगडा बंदोबस्त राज ठिकठिकाणी लावण्यात आला होता.

Maratha Aarakshan Mumbai March साठीच्या मोर्चाचा तिसरा दिवस,गर्दी किती, काय घडतयं- Manoj Jarange Patil

शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या पत्नी वडील त्यांचा मुलगा व मुलगी देखील त्यांच्यासोबत शहागड पर्यंत या यात्रेत पाई चाललेत.सात महिने झाले तरी जरांगे पाटील घरी आले नसल्याने कुटुंबाला अश्रू अनावर झाले आता तरी हा लढा लवकर संपवा अशी मागणी त्यांच्या कुटुंबीयांनी यावेळी केली. 

शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे दर्शन घेऊन जरांगे पाटलांनी आपल्या मोर्चाला सुरुवात केली पहिल्या दिवशी विरोधी पक्ष असणारा शरद पवार गटातील राजेश टोपे देखील मोर्चा मध्ये सहभागी झाले होते. 

महाकाळ येथे पोहोचतात सुवासिनी त्यांचा औक्षण केला पहिल्या दिवशी हा मोर्चा माथुरी(मूळगावी Mathori) या गावात मुक्काम होता. 

मध्यरात्री जरांगे पाटलांनी यांच्या माथुरी(मूळगावी ) भव्य स्वागत झाल्यानंतर आमदार बच्चू कडू देखील माथुरी(मूळगावी )  गावात पोहोचले होते.  यावेळी त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत जेवण केलं. 

थोडक्यात बच्चू कडू यांनी जरांग यांच्या पदयात्रेतील एक प्रकारे पाठिंबा दर्शवला.

मोर्चाच्या दुसऱ्या दिवशी नेमकं काय घडलं

माथुरी(मूळगावी ) मधून ही पदयात्रा नगर जिल्ह्याकडे निघाली त्यानंतर यात्रा पाथर्डी रोडने अहमदनगर येथे निघाली या यात्रेपूर्वी जरांगे यांनी पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी सरकारला थेट इशारा दिला. 

“आमच्या नोंदी सापडल्यास त्यांनी मराठ्यांचे ताकद पहिले असेल मराठा समाजाचा हा शेवटचा लढा आहे दोन दिवस वाट पाहणार अन्यथा त्यांनी आमच्या गावात येऊ नये. मुंबईला येऊ नका असे कसे म्हणतात दादागिरी ची भाषा करू नये 26 जानेवारी च्या आधी तोडगा काढा असं जरांगे म्हणाले” 

नगरमध्ये मनोज जरांगे पाटील यांचे फटाके वाजवून महिलांनी औक्षण करून जंगी स्वागत झालं. त्यानंतर संध्याकाळी ही पदयात्रा बारा बाभळी येथे पोहचली. बारा बाभळी येथे अहमदनगर सकल मराठा समाजाच्या वतीने संध्याकाळी सात वाजता भव्यसभा आयोजित करण्यात आली होती,  दिवसभराचा बारा बाभळी ते रांजणगाव असा प्रवास करून सोमवारी सकाळी नऊ वाजता जरांगे निघाले असून सुपा येथे दुपारचे जेवण करून रांजणगाव येथे मुक्काम करणार आहेत. 

मुस्लिम मदरसाने दिली 85 एकर जागा

महत्त्वाचे घटना म्हणजे मराठा समाजाचा मुक्कामाच्या व्यवस्थेसाठी मुस्लिम समाजाने मदरशाची 85 एकर जागा दिली होती बारा बाभळी येथे दीडशे एकरवर मुक्कामाची व्यवस्था होती त्यापैकी 85 एकर जागाही मदरशाची होती. 

या जागेत जरांगे यांनी दुसऱ्या दिवशी मुक्काम देखील केला जागा उपलब्ध करून देण्यास सोबतच मदरशातील साडेतीनशे विद्यार्थ्यांनी यावेळी पदयात्रेत सहभागी मराठा बांधवांची सेवा देखील केली. 

याशिवाय यावेळी परिसरात भगवे झेंडे लावण्यासाठी देखील परवानगी देण्यात आली होती. 

मोर्चाच्या तिसरा दिवशी नेमकं काय घडलं

सोमवार या पदयात्रेचा तिसरा दिवस तिसऱ्या दिवशी बारा बाभळी सकाळी नऊ वाजता निघालेले जरांगे दुपारी सुपा येथे पोहोचले. 

या दरम्यान त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळेस छगन भुजबळ वर टीका करण्याबरोबरच त्यांनी मुस्लिम आणि धनगर समाजाच्या आरक्षणासाठी लढा देणार असल्याचे देखील सांगितलं. 

कोणत्याही परिस्थितीत मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याशिवाय आपण माघार घेणार नाही असा इशारा दिल्यानंतर बारा बाभळी सकाळी नऊ वाजता निघालेले जरांगे सोमवारी दुपारी नगर येथे पोहोचले आता जरा मोर्चा नगर मधून निघाला असून नगर असता भागात चौक बंदोबस्त ठेवण्यात आलाय. 

या पदयात्रेत लाखोंच्या संख्येने मराठा बांधव सहभागी झाले ते व्हिडिओ सध्या पुढे येतात.

कशी आहे पुणे पोलिसांची मोर्चाची तयारी

या मोर्चाचा पुढचा मुक्काम पुण्यात असल्याने पुणे पोलिसांनी देखील सुरक्षेची तयारी केली मंगळवारी पुण्यातील खराडी परिसरात पदयात्रेचा मुक्काम असणारे त्यामुळे 1000 पोलीस राज्य राखीव पोलीस(Reserve police force RPF) दलाच्या दोन तुकड्या दंगल नियंत्रण पथक गृहरक्षक दलाच्या 800 जवान बंदोबस्तासाठी तैनात राहणार असल्याची माहिती समोर आली. 

मंगळवारी मराठा समाजाचा मोर्चा खराडी वाघोली परिसरात आर के फार्मचा मोकळ्या जागेत मुक्कामी राहणार. तेथे एक हजार स्वच्छतागृह, रुग्णवाहिका, शंभर पाण्याचे टँकर, आरोग्य सुविधा, उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. 

एकीकडे मनोज जरांगे पाटील मोर्चा आक्रमक होत असताना दुसरीकडे सरकारकडून मात्र वारंवार जरांगेंना मुंबईला न येण्याचा आवाहन केले जाते.

काय म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे? 

“जरांगे पाटील यांनी आंदोलन थांबवलं पाहिजे त्यांनी सुरू केलेल आंदोलन टाळलं पाहिजे आंदोलनाचा जनतेला त्रास होतोय. आम्ही मराठा आरक्षणासंदर्भात शनिवारी बैठक घेतली त्या बैठकीला सर्व अधिकारी होते गोखले इन्स्टिट्यूट चे प्रतिनिधी होते, मराठा आरक्षणासाठी फेब्रुवारी महिन्यात विशेष अधिवेशन घेण्यात येणारे त्यात मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय घेतला जाईल.” 

दुसरीकडे मुंबईच्या आजाद मैदानावर होणाऱ्या मराठा समाजाच्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांच्या सुट्ट्या 28 तारखेपर्यंत रद्द करण्यात आल्याचे देखील माहिती समोर आली. मोर्चाला मुंबईत जाण्यापासून सरकार रोखू शकेल का हा मोर्चा महाराष्ट्रातला राजकारण होऊन टाकेल का आणि नेमकं पुढे या मोर्चाचं काय होईल 

पुढे वाचा

Ayodhya Ram Mandir | मुंबई उच्च न्यायालयाने राम मंदिर अभिषेक दिनी सार्वजनिक सुट्टीच्या महाराष्ट्र सरकारच्या घोषणेला आव्हान देणारी जनहित याचिका फेटाळली

Bombay High court refuge PIL Holiday

महाराष्ट्र सरकारच्या अधिसूचनेला विरोध करणाऱ्या चार कायद्याच्या विद्यार्थ्यांनी दाखल केलेली जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाने आज फेटाळून लावली

न्यायमूर्ती जीएस कुलकर्णी आणि न्यायमूर्ती नीला गोखले यांच्या विशेष खंडपीठाने असे निरीक्षण नोंदवले की, विविध धर्मांच्या देशात राज्याचा चुकीचा निर्णय धर्मनिरपेक्षतेच्या तत्त्वाला चालना देतो. सार्वजनिक सुट्ट्यांच्या विषयावरील उदाहरणांच्या कॅटेनाचा(Catena of Precedents) संदर्भ देत खंडपीठाने सांगितले.

” धार्मिक गरजांवर आधारित धोरणाचा विषय असलेल्या सुट्टीची घोषणा हा मनमानी निर्णय असू शकत नाही, परंतु तो धर्मनिरपेक्ष तत्त्वांशी सुसंगत आहे, असे न्यायालयांनी घेतलेले सातत्यपूर्ण मत आम्हाला आढळते.”

Bombay High court

कशा आहेत Ram lalla च्या ४ मूर्ती

महाराष्ट्र शासनाच्या आदेशाला विरोध: Bombay high-count reject Pill

महाराष्ट्र सरकारने शुक्रवारी (19 जानेवारी) आदेश जारी करून 22 जानेवारीला राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर केली होती. कोणत्याही धार्मिक कार्यक्रमासाठी सार्वजनिक सुट्टी जाहीर करणे हे संविधानाने दिलेल्या धर्मनिरपेक्षतेच्या तत्त्वांचे उल्लंघन आहे, असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे होते. कोणतेही राज्य कोणत्याही धर्माशी जोडू शकत नाही किंवा त्याचा प्रचार करू शकत नाही, असा युक्तिवाद विद्यार्थ्यांनी केला.

विध्यार्थी काय म्हणाले

विद्यार्थ्यांनी याचिकेत नमूद केले आहे की, सरकारने हिंदू मंदिराचा उत्सव उघडपणे साजरा करणे आणि त्यात सहभागी होणे म्हणजे धर्मनिरपेक्षतेच्या कल्पनेच्या विरोधात जाण्यासारखे आहे. सर्व धर्मांना समान वागणूक देण्याच्या तत्त्वावर हा थेट हल्ला असल्याचे त्यांचे मत आहे.

त्यात अधिक म्हटले होते की, सरकारच्या स्थानीक सत्तेच्या इच्छांवर आधारित कोणतेही धोरण सार्वजनिकपणे सुट्टी जाहीर करण्यात येऊ शकत नाही. परंतु, देशभक्तीला आदर्श मानताना किंवा ऐतिहासिक व्यक्तींचे स्मरण करताना जाहीर केली जाऊ शकते, परंतु ती सुट्टी समाजातील कोणत्याही खास वर्ग किंवा धर्मिक समुदायाला खुश करण्याची किंवा राम लला ची प्रतिष्ठा साजरी करण्याची हवी नाही.

Manoj Jarange Patil | ‘मुंबईत तुम्हाला 3 कोटी मराठ्यांचा आकडा पार करुन दाखवू

Manoj jarange patil

मनोज जरांगे पाटील यांनी असं म्हटलंय आहे कि,  मुंबईत (Mumbai March) तुम्हाला 3 कोटी (3 crore) मराठ्यांचा आकडा पार करून दाखवू असे जरांगे यांनी म्हटलेलं आहे तर मनोज मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेमुळे मुंबई विस्कळीत होऊ शकते असा शंभूराज देसाई वाटतं.

Manoj Jarange Patil
मुंबईत तुम्हाला 3 कोटी मराठ्यांचा आकडा पार करुन दाखवू

 54 Lakh लोकांना सर्वांना लगेच एका आदेशावर प्रमाणपत्र देता येत नाही असे मंत्रि शंभूराज देसाई यांनी म्हटलं फेब्रुवारीमध्ये विशेष अधिवेशन घेऊन प्रश्न मार्गी लागेल असे त्यांनी म्हटलं.

Manoj Jarange Patil मी मरणाला घाबरणारा नाही

मनोज जरांगे  पाटील म्हणाले माझे या सरकार ला एकाच सांगणे आहे कि स्वतः मुख्यमंत्री शिंदे साहेबांना तर मनातून लक्ष घालावं आणि फडणवीस साहेबांना सुद्धा मनातून लक्ष घालावे कारण मुंबईच्या गल्ली गल्लीत मराठा आणि मराठा दिसणार तुम्हाला 26 January ला 3 तीन करोड मराठा आणि फक्त मराठाच दिसणार कारण मराठ्यांनो या आणि इतक्या ताकदीने घराच्या बाहेर पडा, मी आपले लेकरं मोठे व्हावेत मनून घराच्या बाहेर पडून मारायला देखील तयार आहे , कोणाचीही भीती बाळगण्याची काहीही गरज नाही सगळ्या मराठ्यांनी बाहेर पडा आणि शक्ती दाखवा या देशाला आणि जगाला वाटलं पाहिजे असली एकजूट कधी बघितली नाही.  

https://mahabuzznews.com/manoj-jarange-patil-mumbai-: Manoj Jarange Patil | ‘मुंबईत तुम्हाला 3 कोटी मराठ्यांचा आकडा पार करुन दाखवू

शंभूराज देसाई पुढे म्हणाले:- मनोज जरांगे  पाटील  यांच्या म्हणण्यानुसार ५४ लाख लोकांना शासकीय आदेश काढून कुणबी प्रमाणपत्र दिले तर ते उद्या कोर्टात टिकू शकणार नाही उद्या कोर्टामध्ये तो टिकला नाही तर त्याचा विपरीत परिणाम 54 Lakh लोकांवर होणार आहे नुकसान कोणाचा होईल म्हणून सरकार व्यवस्थित खबरदारी सगळी घेऊन पावलं टाकताय आणि मुंबईमध्ये एवढ्या मोठ्या संख्येने यात्रा काढून मुंबईमध्ये जाऊन मुंबईच्या लोकांची गैरसोय होणार आहे आणि येणाऱ्या लोकांची गैरसोय होणार आहे आणि फेब्रुवारीमध्ये विशेष अधिवेशनोषणा मुख्यमंत्री साहेब काय तो निर्णय घेतील

सरकारची अडचण वाढणार; मराठा आरक्षण मुद्दा तापणार, मुंबईला निघण्यापूर्वी जरांगेंनी शेवटचा डाव टाकला

Maratha Reservation : मनोज जरांगे यांनी सरकारवर शेवटचा डाव टाकला आहे. त्यामुळे आता सरकारची अडचण वाढणार आहे

Manoj Jarange Patil Mumbai March मराठा आरक्षण:

मनोज जरांगे(Manoj Jarange) सध्या अंतरवली सराटी(Antarwali Sarathi) येथून मुंबईला निघाले असून मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीबाबत सरकारविरोधात जोरदार भूमिका घेतली आहे. मुंबईला जाण्यापूर्वी त्यांनी प्रेस कॉन्फरेन्सच्या माध्यमातून सरकारला अंतिम आव्हान दिले आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या विधानावरून असे सूचित होते की सरकारला वाढत्या अडथळ्यांना सामोरे जावे लागू शकते, कारण ते शहरात पोहोचण्यापूर्वी मुंबईतील मराठा समाजाशी संवाद साधण्याची त्यांची योजना आहे. या भेटीदरम्यान, मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथून उपोषण सुरू करणे अपेक्षित आहे, संभाव्यत: परिस्थिती हाथळण्याचे सरकारसमोर एक महत्त्वपूर्ण आव्हान उभे ठाकले आहे.

मराठा आरक्षण : मी मागिल ५ महिन्यांपासून झोपत नाही आणि रात्री मला झोप लागली नाही : मनोज जरांगे पाटील

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिलेली मुदत संपली असतानाही ते हजारो मराठ्यांसह मुंबईकडे कूच केली आहे. या प्रवासाला सुरुवात करण्याच्या निर्णयाकडे या मुद्द्याची निकड अधोरेखित करण्याचा प्रयत्न म्हणून पाहिले जात आहे. आरक्षणाच्या मागणीकडे लक्ष देण्यास सरकारच्या अनास्थेमुळे समाजात मोठ्या प्रमाणात आत्महत्या होत असल्याने भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे, यावर मनोज जरांगे पाटील यांनी भर दिला आहे.

मनोज जरांगे पाटील यांनी उत्स्फूर्तपणे बोलतांना मराठा समाजाने संघटित होण्याचे आवाहन केले आहे आणि त्यांच्या निर्णयावर भावनांचे ढग येऊ देऊ नका. पेठेतील एका तरुणाने दुःखी आई-वडिलांना सोडून स्वतःचा जीव घेतल्याची हृदयद्रावक घटना त्यांनी निदर्शनास आणून दिली आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या म्हणण्यानुसार, उपोषण हा शेवटचा उपाय असल्याने अशा दुर्घटना तातडीने कारवाईची गरज अधोरेखित केली आहे.

मराठा आरक्षण

सरकारच्या प्रतिसादाबाबत नाराजी व्यक्त करत मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ ५४ लाखांहून अधिक स्वाक्षऱ्या जमा झाल्या असूनही सरकार उदासीन असल्याचा दावा केला आहे. ज्या मराठ्यांना सत्तेवर आणण्यात मोलाची भूमिका बजावली, त्या मराठ्यांना आरक्षणाचा हक्क नाकारून सरकार निर्दयी असल्याचा आरोप त्यांनी केला. मनोज जरांगे पाटील यांनी जाहीर केले आहे की न्याय मिळेपर्यंत ते आराम करणार नाही.

मरण पत्करायला तयार आहे : मनोज जरांगे पाटील

आव्हाने आणि संभाव्य जोखीम असूनही, मनोज जरांगे पाटील मृत्यूला तोंड द्यावे लागले तरीही आपला लढा सुरू ठेवण्याचा निर्धार केला आहे. ते असे प्रतिपादन करतात की आरक्षण मिळणे हे योग्य आहे आणि माघार घेणे हा पर्याय नाही. मुंबईत मराठा समाजाला वेग आला असताना मनोज जरांगे पाटील यांचे नेतृत्व आणि दृढनिश्चय यामुळे सरकारची अडचण आणखी तीव्र होऊ शकते.

मनोज जरांगे पाटील आणि इतर नेत्यांशी वाटाघाटी करण्याचे सरकारचे प्रयत्न बहुतांशी अयशस्वी ठरले असून, मृत्यूला सामोरे जात असतानाही मराठा आरक्षणाचा संघर्ष कायम राहील, असा त्यांचा ठाम निश्चय दिसून येतो.

Manoj Jarange Patil Mumbai: गरजवंत मराठ्यांचा मोर्चा मुंबई च्या दिशेने रवाना: कसं असणार मोर्चाचे स्वरूप ?

Manoj Jarange Patil Mumbai: गरजवंत मराठ्यांचा मोर्चा मुंबई च्या दिशेने रवाना

Manoj Jarange Patil Mumbai :- मराठा आरक्षण मिळाले तरी मुंबई ला जाणार आणि नाही मिळाले तरीही मुंबई ला जाणार अशी ठाम  भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी घेतली आहे.  लाखो मराठ्यांना सोबत घेऊन मुंबईला जाणार आणि आरक्षण घेऊनच परत येणार तत्पूर्वी सरकारने आरक्षण दिलं तर विजयाचा गुलाल घेऊन मुंबईला जाणार अशी भूमिका जरांगे पाटलांनी घेतली आहे.  त्यामुळे सरकारने कोणताही निर्णय घेतला तरी म्हणून मुंबईला जाणार आहे हे पक्के झाले.

 दुसरीकडे सरकारकडून सातत्याने शिस्टमंडळ पाठवून मनोज जरांगे पाटील यांची मनधरणी केली जाते आहे,  मात्र मनोज जरांगे पाटील आपल्या निर्णयावर ठाम आहेत,  त्यांनी मुंबईला जाण्याचा विचार पक्का केला त्यामुळे जालनातील अंतरवाली सराटी येथे जरांगे पाटलांच्या मुंबई मोर्चाच्या जोरदार तयारीला सुरुवात झाली आहे.

Manoj Jarange Patil

20 जानेवारीला म्हणजे शनिवारी सकाळी नऊ वाजता अंतरवाली सराटीतून या मोर्चाला सुरुवात होणार आहे लाखोंच्या संख्येने मराठा आंदोलके मोर्चा सहभागी होण्याची शक्यता आहे,  त्यामुळे मोर्चाचे स्वरूप कसं असणारे याचा मार्ग कोणता असेल प्रवासाचे टप्पे किती असतील एवढ्या मोठ्या संख्येने येणाऱ्या आंदोलकांची व्यवस्था कशी केली जाणार आणि आत्तापर्यंत मोर्चासाठी काय तयारी झाली त्याची सर्व माहिती आपण या लेखातून घेणार आहोत 

Manoj Jarange Patil Mumbai- कसे असेल मोर्चाचे स्वरूप ?

तर सुरुवातीला पाहुयात मोर्चाचे स्वरूप काय असेल ते,  शनिवारी सकाळी नऊ वाजता मनोज जरांग यांच्या नेतृत्वात मोर्चाला सुरुवात होणार आहे मोर्चात सहभागी होण्यासाठी अंतरवाली सराटीत आजूबाजूच्या गावातील लोक जमा व्हायला सुरुवात झाली आहे. गावात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त देखील वाढवण्यात येतोय काल सकाळपासूनच पोलिसांच्या गाड्या आंदोलन स्थळी दाखल होत आहेत. हा मोर्चा शांततेत पार पडावा यासाठी मोर्चातील स्वयंसेवकांना सूचना देण्यात आल्यात त्या अनुषंगाने तयारी सुरू आहे. 

हा मोर्चा 26 जानेवारीला मुंबईत पोहोचणार असून वाटेत एकूण सहा मुक्काम होणार आहेत तर सातवा मुक्काम मुंबई येथील आझाद मैदानावर असणार आहे.  अंतरवाली सराटीतून मोर्चा निघाल्यानंतर 20 जानेवारीला पहिला मुक्काम बीड जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील मातोरी गावाच्या डोंगर पट्ट्यात असणार आहे.  दुसरा मुक्काम अहमदनगर जिल्ह्यातील करंजी घाट परिसरात असेल तिसऱ्या दिवशी हा मोर्चा पुणे जिल्हात दाखल होईल 22 जानेवारीला तिसरा मुक्काम रांजणगाव येथे होणार आहे,  नंतर 23 जानेवारी चा चौथा मुक्काम पुण्यातील खराडी बायपास येथे असेल.

 पुणे जिल्ह्याचे सीमा ओलांडल्यानंतर पाचवा आणि सहावा मुक्काम अनुक्रमे लोणावळा आणि वाशी येथे होणार आहे त्यानंतर सातवा आणि शेवटचा मुक्का मुंबईतील आझाद मैदानावर असणार आहे. मोर्चात मोठ्या संख्येने लोक येण्याची शक्यताअसल्यामुळे मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावर देखील लोकांची राहण्याची सोय केली जाणार आहे.

Manoj Jarange Patil Mumbai

Manoj Jarange Patil Mumbai- कधी होईल उपोषणाला सुरवात ?

 26 जानेवारी पासून म्हणून जरांगे आमरण उपोषणाला सुरुवात करणार आहेत मोर्चासाठी आत्तापर्यंत काय तयारी झाली  हे पाहुयात : या मोर्चासाठी एक खास ट्रक सजवला जातोय त्या ट्रकमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला जाणारे सर्व मराठा आंदोलक पायी चालणार आहेत तसेच या मोर्चा सोबत जवळपास 100 ट्रॅक्टर देखील असतील प्रत्येक ट्रॅक्टरला ट्रॉली जोडलेली असेल त्या ट्रॉलीत आंदोलकांसाठी आवश्यक असणारा सर्व दैनंदिन सामान ठेवले जाणार आहे.  त्यामध्ये धान्य स्वयंपाक बनवण्यासाठी आवश्यक असणाऱ्या भाज्या मसाले गॅस शेगड्या, चुली पेटवण्यासाठी लाकडं अशा सर्व बाबी ठेवल्या जाणार आहेत.

100 ट्रॅक्टर बरोबर जवळपास 25 ट्रक आणि इतर शेकडो वाहनांचा देखील समावेश असेल ज्या आंदोलकांना पदयात्रेत चालणे शक्य नसेल त्यांना वाहनात बसून प्रवास करतायेईल असं नियोजन केले आहे.

या मोर्चाला पदयात्रा म्हटलं जात असला तरी अंतरवाली सराटी ते मुंबई असे सर्व अंतर पाई चालले जाणार नाहीये, दररोज सकाळी नऊ वाजता पदयात्रेला सुरुवात होईल तंत्र बारा वाजेपर्यंत साधारणतः 12 ते 15 किलोमीटर पायी प्रवास केला जाईल त्यानंतर मनोज जरांगण सह सर्व आंदोलन आपापल्या गाड्यात बसून नियोजन स्थळी मुक्कामासाठी पोहोचणार आहेत.

प्रत्येक मुक्कामाच्या ठिकाणी मराठा समाजाकडून नाष्टा आणि जेवणाची सोय केली जाणार आहे त्यासाठी अंतरवाली सराटीतून महिनाभर पुरेल इतका अन्नधान्या सोबत घेतलं जात आहे,  अन्नधान्य कमी पडलं तर मराठा बांधवांकडून धान्य पुरवला जाणार आहे, याशिवाय मोर्चा सोबत पिण्याच्या पाण्याचे टँकर आणि जनरेटरची देखील व्यवस्था केली गेली आहे. 

मोर्चा सुरू होण्यापूर्वी आंदोलकांना दिलेली सूचनावली खालील प्रमाणे:- 

  1. मोर्चामध्ये सहभागी होणाऱ्या प्रत्येकाने स्वतःला आवश्यक असणाऱ्या वस्तू सोबत आणाव्यात 
  2. रात्री झोपताना सर्वांनी आपापल्या वाहनाजवळ झोपावं. 
  3. मुंबईला जाताना रस्त्यात कोणीही व्यसन करू नये
  4. प्रत्येकाने स्वयंसेवक म्हणून काम करावं 
  5. जे मुंबई पर्यंत येऊ शकणार नाहीत अशा आंदोलकांनी त्यांच्या जिल्ह्याच्या हद्दीपर्यंत मोर्चात सहभागी व्हावं

आता पुढचा मुद्दा म्हणजे मनोज जरांगे पाटील यांची सुरक्षा व्यवस्था कशी असणार आहे:  हा मोर्चा शांततेत पार पडावा यासाठी सरकार कडून सुद्धा उपाय योजना केल्या आहेत.  सुरक्षेसाठी सात प्रकारची सुरक्षा दल तैनात केलीआहेत यामध्ये एसआरपीएफ सीआरपीएफ रॅपिडक्शन फोर्स आणि महाराष्ट्र पोलिसांचा देखील समावेश असणार आहे.

काल सकाळपासून पोलिसांच्या गाड्या अंतरवाली सराटीत दाखल झाल्या आहेत.  सध्याच्या घडीला गावात जवळपास दीड हजार पोलीस तैनात केले आहे सरकारने मनोज जरांगे पाटील याना सुरक्षा दिलीये, तरी पण किमान दोनशे स्वयंसेवक मनोज जरांगे पाटील यांच्या सुरक्षेची काळजी घेणार आहेत. हे सर्व स्वयंसेवक मोर्चा व मनोज जरांगे पाटील यांच्या आसपासच असतील अशा प्रकारे सुरक्षेची व्यवस्था करण्यात आली आहे.

या व्यतिरिक्त मनोज जरांगे पाटील यांच्यासाठी काय सुविधा असणार आहेत पाहुयात मनोज जरांगे पाटील यांच्यासाठी खास व्हॅनिटी व्हॅन सज्ज ठेवण्यात आली या मोर्चादरम्यान म्हणून सहा ठिकाणी मुक्काम करायचा आहे, त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांच्या राहण्याची व्यवस्था या व्हॅनिटी व्हॅन मध्ये करण्यात आली आहे.

कशी आहे व्हॅनिटी व्हॅन :- दोन कंपार्टमेंट मध्ये स्वतंत्र एसी बसवण्यात आल्या,  पहिल्या कंपार्टमेंट मध्ये सोफा ठेवण्यात आला तर दुसऱ्या कंपार्टमेंट मध्ये झोपण्याची व्यवस्था करण्यात आली,  अन्न गरम करण्यासाठी मायक्रोवेव्हन आणि चार्जिंग व्यवस्था देखील देण्यात आली आहे,  तसेच राज्यात सुरू असलेल्या घडामोडी पाहता याव्यात यासाठी टीव्ही देखील बसवण्यात आला आहे. 

सदर व्हॅनिटी व्हॅन ही बीड मधील मराठा बांधवांकडून घेण्यात आली आहे.  मनोज जरांगे पाटील यांनी दोन वेळा आमरण उपोषण केले तेव्हा त्यांची प्रकृती नाजूक आहे त्यामुळे व्यवस्था केल्याचे बोलले जात आहे,  याशिवाय दोन दिवसांपूर्वी जरांगे यांनी ट्रॅक्टर चालवण्याचा देखील सराव केलाय त्यामुळे मोर्चा दरम्यान मनोज जरांगे पाटील ट्रॅक्टर देखील चालवण्याची शक्यता आहे.  

मराठा मोर्चाच्या अनुषंगाने सर्वच पातळ्यांवर जोरदार तयारी केली जाते त्यामुळे मोर्चात मोठ्या संख्येने लोक सहभागी होण्याची शक्यता हा आकडा नेमका किती असू शकतो  हे पाहावं लागणार आहे!